श्री संत सेना महाराज यांनी रामानंदाना गुरु केले.
रामानंदाचे चौदा शिष्य
पूर्वी सांगितल्याप्रमाणे रामानंदाच्या अंतकरणात सेनाजींच्या बद्दल एक प्रकारचे आकर्षण निर्माण झाले होते. हळूहळू परस्पराबद्दलचा आदरभाव वृद्धिगत झाला. आचार्यानी सेनाजीवर अनुग्रह केला आणि उपदेश करुन त्यांनी सेनाजीस आपल्या शिष्यपरिवारात सामिल करुण घेतले. रामानंदाचे चौदा शिष्य होते. १) अनंतानंद २) सुरसुरानंद ३) सेना महाराज ४) सुखानंद ५) नरहरियानंद ६) रोहिदास ७) पिपा ८) तुळशीदास ९) कबीर १०) भारानंद ११) योगानंद १२) रमादास १३) धना १४) पदमावती ही त्यांच्या शिष्यांची नावे आहेत.
रामानंदाचा सेनाजीस उपदेश :-
आई वडिलांच्या इच्छेनुसार लग्न कर, प्रपंच निटनेटका कर. आई वडिलांना सुखी करण्यासारखे पुण्यप्रद अन्य कोणतेही कर्म नाही बाह्य माळा टिळा ही साधुत्वाची लक्षणे नाहीत. परहीन बुद्धि न्याय नितीस धरुन आचरण कर. कर्तव्य कर्म दक्ष रहा. गृहस्थाश्रम, अनासक्ति, कामक्रोध, मोह यांचा त्याग संसारास सुचिर्भूत ठरते. यायोगेच आत्म्यास परमात्म्याचा साक्षात्कार प्राप्त होतो.
हा रामानंदाचा उपदेश सेनाजींच्या ह्दय पटलावर कोरला गेला. देवीदासांच्या पश्च्यात दरबारची नोकरी सेनाजीस मिळाली. ते रोज महाराणांची श्मश्रु करीत तैलमर्दन करीत. त्यांनी प्रपंच निटनेटका केला.
धन्य रामानंद । धन्य सेना महाराज
सद्गुरु वाचोनी सापडेना सोय हेच खरे.